कान्हेरी लेणी अभ्यास दौरा.
************************
बोरीवली राष्ट्रीय उद्यानात आज बुद्ध कालीन इतीहासची आठवण करुण देणारे जगप्रसिद्ध बौद्ध विश्वविद्यालय कान्हेरी लेणी.
सम्राट अशोकांचे मांडलिक सातवाहन राजां च्या कारकिर्दीत कोरलेला कान्हेरी हां बुद्ध कालीन अनमोल लेणी समुह.
सम्यक सांस्कृतिक संघ, मुंबई पाली विभाग, भारत लेणी संवर्धन समिती आणि मुंबई पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शना खाली मला कान्हेरी लेणी ची खुप सारी माहिती मिळाली.
आज कान्हेरी लेणी ला भेट द्यायची माझी तीसरी वेळ, कारण होते मुंबई विद्यापिठात पाली मधे mphil करत असलेले व भारतातील बुद्ध लेणी अभ्यासक माझे मित्र राहुल राव हे कान्हेरी लेणिस भेट देउन आलेले आणि त्यांनी त्यांचे फोटो फेसबुक वर टाकले होते,ते मी पाहिले पण त्यांनी जे फोटो टाकले होते ते मी प्रथमच पाहत होतो या अगोदर मी दोन वेळेस कान्हेरी वर जाउन आलो होतो पण मला हे ठिकान निदर्शनात आले नव्हते. मी त्यांना फोन करुण विचारले हे ठिकान कोणते आहे तर माहिती मिळाली की हे निर्वाण गृह आहे जिथे त्या काळी ७५ अर्हन्त भिक्शुंचे विटा मधील स्तुप आहेत तेव्हा मी ठरवले की इथे आपण भेट दिली पाहिजे..
आणि ठरल्या प्रमाने आम्ही बोरीवली राष्ट्रिय उद्यानाच्या प्रवेश दवारावर भेटलो.प्रवेश तीकीट काढुन आम्ही आत प्रवेश केला. प्रवेश द्वारापासुन कान्हेरी लेणी या ७ की.मी. अंतरावर आहे, तिथे पोहचन्यासाठी उद्यानाच्या बस तसेच सायकल सुद्धा उपलब्ध आहेत.
कान्हेरी पर्वताचे नांव तेथील एका शिला
लेखांत "कान्हासील" असे दिले आहे.
कान्हेरीला "कान्हागिरी" किंवा
"कृषगिरी" असेही म्हटले आहे. येथे
एकूण १२८ लेणी आहेत. १०७ विहार आणि ५
चैत्यगृह आहेत. इसवीसन पुर्वी दुस-या
शतकापासून ते इसवीसन नंतर ११ व्या शतकापर्यंत
म्हणजे तेराशे वर्षे या लेणी तयार करण्याचे
काम चालू होते. हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात
असताना तेथे तोफांची नेमबाजी कवायत
चालत असे. त्यामुळे तेथील ब-याच लेण्यांचे नुकसान
झाले आहे. इसवीसन १७१६ ते १७२०
साली मुंबई प्रातांचा राज्यपाल असताना "बून" ने
कान्हेरी येथील लेण्यांचा सखोल अभ्यास
केला. त्याच्या मते कान्हेरी येथील
लेणी खोदून सर्व दृष्टीने पुर्ण करण्यास
४० हजार माणसे सतत ४० वर्षे खपली
असली पाहिजेत. ह्या अंदाजावरुन २ हजार
वर्षापुर्वी अस्तित्वात असलेल्या अत्यंत साध्या साधनांचा
उपयोग करुन एक लेणी पुर्ण करण्यास किती वेळ,
काळ आणि खर्च येत असावा याची कल्पना येते.
कान्हेरी इसवीसन पूर्वी २००
वर्षापासून इसवीसनानंतर १३ व्या शतकापर्यंत म्हणजे
जवळ जवळ १५०० वर्षे भरभराटीस आलेले बौद्ध
विश्वविद्यालय होते.
लेणी प्रवेश द्वारा वर पुरातत्व खात्याचे टिकिट काढुन आम्ही पुढे गेलो..समोरच भव्य अशी लेणी पहायला मिळते. लेणी क्रमांक 2 मधे दगडा मधे कोरलेले स्तुप आहेत, स्तुपा भोवती बुद्धांच्या, वज्रपानि,पद्मपाणी,अवलोकितेश्वर यांच्या मुर्ति कोरलेल्या आहेत.लेणी क्रमांक 3 ही सर्वात मोठी लेणी असुन त्या मधे एक खुप मोठा चैत्य स्तूप आहे तसेच बाजुला जे खांब आहेत त्या खांबा वर राजा आणि रानी हे बुद्ध प्रतिके बोधिवृक्ष, सिरिपाद, स्तूप यांची हत्तीं वर येउन पुजा करत असतानाचे खुप सुंदर शिल्प कोरलेले आहेत. लेणी प्रवेश द्वारा च्या बाजुला 2 अतिभव्य 32 फुट उंचीच्या बुद्ध मुर्ति आपणास दिसतात.. तसेच बुद्धांच्या अनेक प्रकारच्या ध्यान मुद्रा सुद्धा लेणी प्रवेश भिंतीवर कोरलेली आहेत. ज्या सातवाहन राजांनी या लेणिस दान दिले त्या राजा,रानीं ची शिल्पे सुद्धा पहायला मिळतात. लेणी समोरच अरहंत भिक्षु सारिपुत्त यांचा अस्थि स्तुप आहे त्याचे काही विटाचे अवशेष आज शेष आहेत.
३८ नंबरच्या लेण्यांमध्ये आणि आसपास जवळ जवळ ६०० फूट
लांबीच्या गॅलरीमध्ये विटांनी
बांधलेले पण आता उध्वस्त झालेले अनेक स्तूप आहेत.
लूटारुंनी ते तोडून आतील
किंमती वस्तू पळविलेल्या दिसतात. कान्हेरी
येथील एका स्तूपात सापडलेल्या वस्तू आणि
ताम्रपटाची माहिती व ८४ नंबरच्या
लेण्याच्या पुढे नदीच्या उत्तरेच्या बाजूस
भट्टीचे अस्तित्व दिसून येते. ह्यावरुन तेथे लोखंड
आणि धातू करुन त्याचे पदार्थ वापरात आणले जात असावेत असे
वाटते.
पावसाळ्या मधे पावसाचे पाणी लेणी समोरील हौदां मधे साठवन्या साठी डोंगरा मधे एक पानी वाह्न्या साठी एक नळी खोदून ते बरोबर हौदा पर्यन्त आणलेले आपल्याला दिसतात आणि जवळ जवळ
प्रत्येक लेण्याला खेळते पाणी पुरविण्याची
व्यवस्था, तसेच लेण्यांच्या बाहेरच्या जागेत
बसण्यासाठी असलेली दगडी
बाके, एका लेण्यापासून दुस-या लेण्याकडे जाण्यासाठी
असलेला मार्ग, पाय-याचे जिने आणि जिन्यावरुन चढता उतरतांना
हातांनी धरण्यासाठी केलेले कठडे
ही कान्हेरीच्या लेण्यांची
वैशिष्ठे आहेत. हे विश्व विद्या लय हे जगातील सर्वच विद्यार्थ्यां साठी अध्यापनासाठी
प्रसिद्ध होते. कान्हेरी सुध्दा एक तक्षशिला आणि नालंदा सारखे एक जग प्रसिद्ध विश्वविद्यालय होते
होते. तेथील ग्रंथालयाला दिलेल्या देणग्यांचा उल्लेख
शिला लेखांत आला आहे.
अनेक देणगीदारांनी कान्हेरी
येथे ग्रंथालयासाठी देणग्या दिलेल्या आहेत. पहिल्या
ओमघवर्षाच्या कारकिर्दीत नवव्या शतकाच्या
सुरुवातीला भद्रविष्णूने आपल्या
देणगीपैकी काही ग्रंथ
खरेदीसाठी दिली आहे. तसेच
अविघ्नकार नावाच्या एका बंगाली व्यापा-याने
कान्हेरीच्या संघास ग्रंथ
खरेदीसाठी दान केल्याची नोंद
आहे. ६६ नंबरच्या एका भिंतीवर जापानी शिलालेख कोरलेला दिसतो त्यात निचिरेने बौद्ध
पंथातील एक जपानी प्रवाशाने भेट
दिल्याची नोंद आहे. दरबार हॉल विद्यालयाचे सभागृह
म्हणून वापरला जात असावा.
कान्हेरी येथील लेण्यांतील
ताम्रपट आणि शिलालेख
कान्हेरी येथील लेण्यांत डॉ. जेम्स बर्ड
ह्यांना १८३९ मध्ये २ ताम्रपट सापडले.
ह्यासंबंधीची माहिती त्यांच्या
शब्दात, "पाहणी करण्यासाठी म्हणून
सर्वांत मोठा स्तूप निवडला. तो एके काळी १२ किंवा १६
फूट उंचीचा असावा. तो घडीव दगडांचा असून
त्याची बरीच पडझड झाली
होती. वरुन खाली
जमीनीपर्यंत खोदल्यानंतर आणि दगड,
माती बाजूला काढल्यानंतर कामगारांना एक वर्तुळाकार
दगड सापडला. तो मध्ये पोकळ असून वर जिप्समच्या तुकड्याने
झाकला होता. त्या दगडात तांब्याचे २ लहान कलश होते. एका
कलशामध्ये थोडी रक्षा, एक रुबी ( लाल )
एक मोती, सोन्याचे लहान तुकडे आणि
सोन्याची एक लहान पेटी
होती. त्या पेटीत वस्त्राचा एक तुकडा
होता. दुस-या कलशात एक चांदीची
पेटी आणि थोडी रक्षा होती.
त्या कलशांच्या जवळच लथ लिपीतील किंवा
लेण्यावरील लेखासाठी वापरण्यात येणा-या
लिपीतील २ ताम्रपट होते."
कान्हेरी शिलालेखामुळे सांस्कृतिक इतिहासात भर--
कान्हेरीचे शिल्प व तेथील शिलालेख यामुळे
भारताच्या सांस्कृतिक इतिहासात फार मोलाची भर
पडली आहे.
कान्हेरीच्या १२८ लेणी या बौद्ध भिक्षू-
भिक्षूणीना राहण्यासाठी बांधल्या होत्या
आम्ही कान्हेरी ला ज्या साठी गेलो होतो ते ठिकान म्हणजे 75 अर्हन्त भिक्शुं चे निर्वाण स्तुप त्या ठिकाना ला स्मशान गुंफा किंवा निर्वाण गृह असे म्हणतात कान्हेरी लेणी वर खुप सारे पर्यटक येत असतात परंतु या निर्वाण गुंफे कड़े कोणीही जात नाही..
डोंगरात कोरलेल्या पाहिर्यानी आम्ही या ठीकानाच्या प्रवेश ठिकाणी पोहचलो तिथे बुद्धांच्या पाय त्याला पाली भाषेत सिरिपाद म्हणतात ते कोरलेले दिसले त्याच्या बाजुलाच निर्वाण गृह असे ब्राम्ही भाषेत कोरलेले दिसले त्या नंतर पुढे भाजलेल्या विटान मधे खुप सारे स्तुप्पांचे अवशेष पाहिले आपल्या महाराष्ट्रात स्तुप हे दगडात कोरलेले सापडतात परंतु कान्हेरितिल स्तूप हे विटा मधे बांधलेले आहेत असे स्तुप सम्राट अशोकानी बुद्ध अस्थिं वर उभारलेले आपणास दिसतात तसेच नालंदा,तक्षशिला या ठिकाणी सुद्धा या प्रकारचे स्तुप अस्तित्वात आहेत.या परिसर खुपच शांतता अनुभवास येते..जंगलातिल पक्षांचा किलबिलाट,वार्याचा आवाज याने मन शांत होते आणि बाजुलाच अर्हन्त भिक्शुंचे स्तूप. स्तुपा च्या हर्मिका या बाजुलाच पडलेल्या दिसल्या. इथे 3 बुद्ध विहाराचे भग्नावशेष सुद्धा दिसतात..तसेच भग्न झालेले दगडी स्तुप सुद्धा पहावयास मिळाले
कान्हेरी लेणी स्मुहातिल दुर्लक्षित असलेले हे ठिकाण
पाहिल्यावर मनात विचार आला की आपन आपला सांस्कृतिक इतिहास असा अड़गलीत का टाकला आहे.
. या स्तूपावर २२ शिलालेख उपलब्ध
झाले आहेत. त्यात बौद्ध आचार्यांची नावे व त्यांच्या
पदव्या आढळतात.
हे पाहुन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलि खाली लेणी समोरच थाइलैंड आणि चीन चे बौद्ध भिक्षु आमच्या नजरेस पडले त्याना समोर पाहुन एक वेळ असे वाटले की 2000 वर्शांची कान्हेरी पुन्हा जीवंत झालिय,आम्ही भिक्शुन्ना वंदन केले त्यातील चीन च्या भिक्षुन्नी आम्हाला धम्म सांगितला आणि त्याना वंदन करुण आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो, बाहेरच्या देशातून लोक या लेणी पहायला येतात आणि आपण आपल्या जवळ असुनही जात नाहित.
बौद्ध कान्हेरीला कसे
पोहचले याचे विश्लेषण करतांना डॉ. गोखले म्हणाल्या, "सम्राट
अशोकांने काही भिक्षू सिलोनला पाठविले ते
उज्जयिनी, कल्याण, सोपारा या मार्गाने
कान्हेरीला आले वाकाटकांकडे त्यांना राजाश्रय
मिळाला."
गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या
कारकिर्दीत येथील विहार गजबजलेले होते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडण-घडणीत बुद्ध धम्माचा
फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात बुद्ध धम्माचा प्रवेश
इसवीसनापुर्वी पाचव्या शतकात झाला
तेव्हापासून सतत एक हजार पाचशे वर्षे बुद्ध धम्माची
शिकवण महाराष्ट्रीयांना मिळाली आहे. ह्या
शिकवणीत व्यक्ती विकासावर फार भर दिला
आहे. व्यक्ती विकासाच्या किंवा समाज विकासाच्या आडo
येईल अशी एकही गोष्ट बुद्ध धम्मात
नाही. व्यक्तीने प्रयत्न केला तर
ती स्वत: बुध्दत्वापर्यंत आपला विकास करु शकते
अशा त-हेचे प्रोत्साहन बुद्ध धम्मात दिले जाते. अशा
शिकवणीतून जी महाराष्ट्र
संस्कृती निर्माण झाली तिने जुन्नर,कार्ले भाजे,
कान्हेरी आणि अजंठा ऐलोरासारखे जगाला थक्क करणारे
वास्तुशिल्प निर्माण केले त्या संस्कृतीचा वारसा
आपल्याला मिळाला आहे. बोधी म्हणजेच ज्ञान,
म्हणूनच बोरीवली न म्हणता
"बोधीवली" म्हणणेच उचित ठरेल.
त्यादृष्टीने आवाज बुलंद झाला पाहिजे आणि परिवर्तनाचे
चक्र गतीमान झाले की इतिहास निर्माण
करणारे इतिहास विसरु शकत नाहित हे सिध्द होईल.
कान्हेरी हा अनमोल इतिहास आहे प्रतेकाने
एकदा तरी कान्हेरी लेणी ला अवश्य भेट दया.
Siddharth
7757891409
Great historical place .... Unbelievable data....
ReplyDeleteThanks...
Thanks
DeleteGreat historical place .... Unbelievable data....
ReplyDeleteThanks...
ध्यन्यवाद सिद्धार्थ दादा अतिशय अमूल्य आणि खुप महत्वाची माहिती आपण आम्हापर्यंत पोचवलीत, खुपच अप्रतीम सुबक शिल्प आहेत ही खरच प्रत्येकाने एकदा तरी ही पहावित.
ReplyDeleteधन्यवाद
Delete