दोन हजार वर्षां पुर्वीचा सातवाहन कालीन कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावरील नानेघाट
महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्टया संपन्न असलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका.जुन्नर ला दोन हजार वर्षांपुर्वीचा इतिहास सातवाहन राजांची व्यापाराची राजधानीच शहर जुन्नर. सातवाहन काळात भारताचा व्यापार हा परदेशात जास्त चालत असे, त्या काळचे प्रसिद्ध व्यापारी बंदर म्हणजे ठाने जिल्ह्यातील सोपारा हे बंदर,सोपार्या पासुनच जवळ असलेले कल्याण बंदर.प्रदेशातील ग्रीक,रोमन येथील व्यापारी भारतात रेशीम,मसाले,हीरे,मानके,मोती यांचा व्यापार करण्यासाठी येत असत.परदेशातून येणारा सर्व माल हा कल्याण च्या बंदरा वर उतरवत आणि पुढे बैलगाड़ी,खेचरां मार्फत तो जुन्नर च्या दिशेने नेत असत.याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे आजही जुन्नर मधे नानेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे.कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावर नानेघाट आहे, या नानेघाटा मधे सातवाहन राणी नागनीकेने व्यापारी आणि प्रवाश्यांच्या विश्रांति साठी लेणी कोरली त्या लेणी मधे तिने तिच्या परिवारातील लोकांचे पुतळे कोरुन ठेवले होते आणि त्या प्रत्येक पुतळ्याच्या वर त्यांची नावे कोरली तसेच या लेणीच्या भिंतीवर पाली भाषेतील ब्राम्ही लिपि मधे शिलालेख सुद्धा कोरलेले आहेत. पुढे पेशवाईच्या काळात हे पुत ळे तोडन्यात आले आज त्यांचे फक्त पायाचे अवशेष शिल्लक आहेत आणि त्यांच्या वर लिहलेल्या नावावरून त्यांची ओलख सिद्ध होते.
व्यापारी आणि प्रवाशां साठी ठीकठिकाणी पाण्याचे हौद सुद्धा खोदन्यात आलेले आहेत. दोन हजार वर्षांपुर्वीचा एक मोठा दगडी रांजण आज तिथे पहायला मिळतो. या रांजनाचा उपयोग त्या काळी कर वसुली करण्यासाठी करत असत. एका दिवसात तो रांजन नान्याने भरत असे यावरूनच या घाटाला नानेघाट असे नाव पडले.
व्यापारी,प्रवासी लोक जे नाने यामधे टाकत असे त्यास कार्षापन बोलतात.ज्या अर्थाने त्या काळी तो रांजन एका दिवसात भरत असे त्यावरून आपण हे समजु शकु की त्याकाळी नाणेघाटा मार्गे रहदारी किती असेल आणि किती विपुल प्रमाणात व्यापार चालत असेल.
जुन्नर मधुन जाणार्या या प्राचीन व्यापारी मार्गावर अनेक बौद्ध लेण्या तसेच नानेघाटाच्या संरक्षनार्थ किल्ले जीवधन,चावंड,निमगिरी,हडसर, सिंदोळा, शिवनेरी या सारखे किल्ले सुद्धा निर्माण केले.
जुन्नर ला हे वैभव प्राप्त करून देणार्या सातवाहन घरान्या बद्दल थोड़ी माहिती
महाराष्ट्राला वैभव मिळवून देणारे राजे म्हणून सातवाहनांचा उल्लेख केला जातो. सातवाहनाना आंध्रभृत्य म्हटल्या जाते.आपल्या शिलालेखात " दक्षिणाधीपती,वेणाकटस्वामी" असा गौरव सातवाहनांनी केलेला आहे. महाराष्ट्रात लेणी,स्तूप,विहारांची निर्मितीत सातवाहनांचा वाटा मोठा आहे. शुन्यवादाचे जनक बोधीसत्व नागार्जून हे सातवाहन राजा यज्ञश्री सातकर्णी यांचे मित्र होते. विदर्भ ही सातवाहनांची मुळ भुमी होती. आपल्या गोंडवनावर सातवाहानांचेच राज्य होते.29 वा सातवाहन राजा विजय सातकर्णी याची नाणी ब्रम्हपुरी येथे मुबलक प्रमाणात मिळाली होती.भद्रावती तालूक्यातील चंदखेडा येथिल उत्खननात सातवाहनकालीन अवशेष मिळाली आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालूक्यात येणाऱ्या कायर या ठिकाणच्या उत्खननात मोठ्या प्रमाणात सातवाहन राजवटीचे अवशेष मिळाले आहे. पोंभुर्णा तालूक्यातील घाटकुळ,मुल तालूक्यातील जूनासूर्ला,चामोर्शी तालूक्यातील मार्कंडा,चपराळा गोंडपीपरी तालूक्यातील येणबोथला,डोंगरगाव येथे सातवाहन राजवटीचे अवशेष मिळत आहेत.
गोंडवनाचे राजे या पोस्टवर इतिहास अभ्यास गोपीचंद कांबळे " विध्यार्थी " यांनी केलेली प्रतिक्रिया
अकोला जिल्हयातील त~हाळा येथे सातवाहन कालीन 1650 नाण्यांचा संचय मिळाला होता. त्यात दहा सातवाहन राजांची नाणी होती.
प्राचीन पवनी येथे सातवाहनकालीन दोन स्तुपाची निर्मिती झालेली आहे.
यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील " कायर " येथे सातवाहन कालीन "महासेनापती "एवढेच अक्षरे वाचन झालेला शिलालेख मिळाला आहे.
नागपुर जिल्हयातील कुही तालुक्यात "चांडोली "च्या जंगलात सातवाहनकालीन प्रथम प्राचीन लेणी कोरलेली आहे.
चंद्रपुर जिल्हयातील भद्रावती येथील प्राचीन लेणी ही सातवाहन काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत तथागत बुध्द यांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत .
चंद्रपुर जिल्हयातील "नागरा " या प्राचीन गावात सातवाहन कालीन विहारी मिळालेल्या आहेत .
सातवाहन राजवंशाचे मुळच विदर्भ असल्याने सातवाहन काळात विदर्भ हा सातवाहन काळात लेणी , स्तुप , शिल्पकलेने नटलेला प्रदेश होता !
सातवाहन राजवटी बद्दल गाडे अभ्यासक तथा लेणी शिल्पकलेचे अभ्यासक आदरनीय महेंद्र शेगावकर सर लिहतात अकोल्यातील ब्रिजलाल बियाणींच्या सँग्राहालायात सिमुक सातवाहनांचे एक नाणे होते , ते त्यांना अकोल्यातच मिळाले होते .
1939 साली शेलू बाजार जवळच्या एका गावात 1650 नाणी सापडली ती सातवाहानांच्या 10 राजांची होती ,.
हे राजे इ,स,पु, 185 ते इ,स,240 पर्यंत एकूण 30 सातवाहन राजे होऊन गेलेत वार्धा ते कन्नान ते अनभोरा संगम अशा नदींच्या खो-यातील त्यांची सत्ता नंतर जुन्नरला गेली तिथे 17 राजे होऊन गेलेत 3 राजे प्रतिष्ठान राहलेत प्रतीष्ठान म्हणजे आजचे पैठण
कल्याण ते पैठण हा दोन हजार वर्षां पुर्वीचा समृद्ध व्यापारी मार्ग सुरु करून जगाशी भारताची नाळ जुन्नर मार्गे जोड्नार्या आणि त्या काळी जगातील समृद्ध असा नानेघाट निर्माण करणार्या सर्व सातवाहन राजांना त्रिवार अभिवादन.
समृद्धि मार्ग निर्माण करु पाहनार्या आजच्या आधुनिक काळातील महाराष्ट्र आणि केंद्रीय सरकारने सम्राट अशोक आणि सातवाहन राजे यांचा आदर्श घ्यावा हीच अपेक्षा.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक दृष्टया संपन्न असलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका.जुन्नर ला दोन हजार वर्षांपुर्वीचा इतिहास सातवाहन राजांची व्यापाराची राजधानीच शहर जुन्नर. सातवाहन काळात भारताचा व्यापार हा परदेशात जास्त चालत असे, त्या काळचे प्रसिद्ध व्यापारी बंदर म्हणजे ठाने जिल्ह्यातील सोपारा हे बंदर,सोपार्या पासुनच जवळ असलेले कल्याण बंदर.प्रदेशातील ग्रीक,रोमन येथील व्यापारी भारतात रेशीम,मसाले,हीरे,मानके,मोती यांचा व्यापार करण्यासाठी येत असत.परदेशातून येणारा सर्व माल हा कल्याण च्या बंदरा वर उतरवत आणि पुढे बैलगाड़ी,खेचरां मार्फत तो जुन्नर च्या दिशेने नेत असत.याचा ऐतिहासिक पुरावा म्हणजे आजही जुन्नर मधे नानेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग अस्तित्वात आहे.कल्याण ते पैठण या व्यापारी मार्गावर नानेघाट आहे, या नानेघाटा मधे सातवाहन राणी नागनीकेने व्यापारी आणि प्रवाश्यांच्या विश्रांति साठी लेणी कोरली त्या लेणी मधे तिने तिच्या परिवारातील लोकांचे पुतळे कोरुन ठेवले होते आणि त्या प्रत्येक पुतळ्याच्या वर त्यांची नावे कोरली तसेच या लेणीच्या भिंतीवर पाली भाषेतील ब्राम्ही लिपि मधे शिलालेख सुद्धा कोरलेले आहेत. पुढे पेशवाईच्या काळात हे पुत ळे तोडन्यात आले आज त्यांचे फक्त पायाचे अवशेष शिल्लक आहेत आणि त्यांच्या वर लिहलेल्या नावावरून त्यांची ओलख सिद्ध होते.
व्यापारी आणि प्रवाशां साठी ठीकठिकाणी पाण्याचे हौद सुद्धा खोदन्यात आलेले आहेत. दोन हजार वर्षांपुर्वीचा एक मोठा दगडी रांजण आज तिथे पहायला मिळतो. या रांजनाचा उपयोग त्या काळी कर वसुली करण्यासाठी करत असत. एका दिवसात तो रांजन नान्याने भरत असे यावरूनच या घाटाला नानेघाट असे नाव पडले.
व्यापारी,प्रवासी लोक जे नाने यामधे टाकत असे त्यास कार्षापन बोलतात.ज्या अर्थाने त्या काळी तो रांजन एका दिवसात भरत असे त्यावरून आपण हे समजु शकु की त्याकाळी नाणेघाटा मार्गे रहदारी किती असेल आणि किती विपुल प्रमाणात व्यापार चालत असेल.
जुन्नर मधुन जाणार्या या प्राचीन व्यापारी मार्गावर अनेक बौद्ध लेण्या तसेच नानेघाटाच्या संरक्षनार्थ किल्ले जीवधन,चावंड,निमगिरी,हडसर, सिंदोळा, शिवनेरी या सारखे किल्ले सुद्धा निर्माण केले.
जुन्नर ला हे वैभव प्राप्त करून देणार्या सातवाहन घरान्या बद्दल थोड़ी माहिती
महाराष्ट्राला वैभव मिळवून देणारे राजे म्हणून सातवाहनांचा उल्लेख केला जातो. सातवाहनाना आंध्रभृत्य म्हटल्या जाते.आपल्या शिलालेखात " दक्षिणाधीपती,वेणाकटस्वामी" असा गौरव सातवाहनांनी केलेला आहे. महाराष्ट्रात लेणी,स्तूप,विहारांची निर्मितीत सातवाहनांचा वाटा मोठा आहे. शुन्यवादाचे जनक बोधीसत्व नागार्जून हे सातवाहन राजा यज्ञश्री सातकर्णी यांचे मित्र होते. विदर्भ ही सातवाहनांची मुळ भुमी होती. आपल्या गोंडवनावर सातवाहानांचेच राज्य होते.29 वा सातवाहन राजा विजय सातकर्णी याची नाणी ब्रम्हपुरी येथे मुबलक प्रमाणात मिळाली होती.भद्रावती तालूक्यातील चंदखेडा येथिल उत्खननात सातवाहनकालीन अवशेष मिळाली आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालूक्यात येणाऱ्या कायर या ठिकाणच्या उत्खननात मोठ्या प्रमाणात सातवाहन राजवटीचे अवशेष मिळाले आहे. पोंभुर्णा तालूक्यातील घाटकुळ,मुल तालूक्यातील जूनासूर्ला,चामोर्शी तालूक्यातील मार्कंडा,चपराळा गोंडपीपरी तालूक्यातील येणबोथला,डोंगरगाव येथे सातवाहन राजवटीचे अवशेष मिळत आहेत.
गोंडवनाचे राजे या पोस्टवर इतिहास अभ्यास गोपीचंद कांबळे " विध्यार्थी " यांनी केलेली प्रतिक्रिया
अकोला जिल्हयातील त~हाळा येथे सातवाहन कालीन 1650 नाण्यांचा संचय मिळाला होता. त्यात दहा सातवाहन राजांची नाणी होती.
प्राचीन पवनी येथे सातवाहनकालीन दोन स्तुपाची निर्मिती झालेली आहे.
यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील " कायर " येथे सातवाहन कालीन "महासेनापती "एवढेच अक्षरे वाचन झालेला शिलालेख मिळाला आहे.
नागपुर जिल्हयातील कुही तालुक्यात "चांडोली "च्या जंगलात सातवाहनकालीन प्रथम प्राचीन लेणी कोरलेली आहे.
चंद्रपुर जिल्हयातील भद्रावती येथील प्राचीन लेणी ही सातवाहन काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत तथागत बुध्द यांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत .
चंद्रपुर जिल्हयातील "नागरा " या प्राचीन गावात सातवाहन कालीन विहारी मिळालेल्या आहेत .
सातवाहन राजवंशाचे मुळच विदर्भ असल्याने सातवाहन काळात विदर्भ हा सातवाहन काळात लेणी , स्तुप , शिल्पकलेने नटलेला प्रदेश होता !
सातवाहन राजवटी बद्दल गाडे अभ्यासक तथा लेणी शिल्पकलेचे अभ्यासक आदरनीय महेंद्र शेगावकर सर लिहतात अकोल्यातील ब्रिजलाल बियाणींच्या सँग्राहालायात सिमुक सातवाहनांचे एक नाणे होते , ते त्यांना अकोल्यातच मिळाले होते .
1939 साली शेलू बाजार जवळच्या एका गावात 1650 नाणी सापडली ती सातवाहानांच्या 10 राजांची होती ,.
हे राजे इ,स,पु, 185 ते इ,स,240 पर्यंत एकूण 30 सातवाहन राजे होऊन गेलेत वार्धा ते कन्नान ते अनभोरा संगम अशा नदींच्या खो-यातील त्यांची सत्ता नंतर जुन्नरला गेली तिथे 17 राजे होऊन गेलेत 3 राजे प्रतिष्ठान राहलेत प्रतीष्ठान म्हणजे आजचे पैठण
कल्याण ते पैठण हा दोन हजार वर्षां पुर्वीचा समृद्ध व्यापारी मार्ग सुरु करून जगाशी भारताची नाळ जुन्नर मार्गे जोड्नार्या आणि त्या काळी जगातील समृद्ध असा नानेघाट निर्माण करणार्या सर्व सातवाहन राजांना त्रिवार अभिवादन.
समृद्धि मार्ग निर्माण करु पाहनार्या आजच्या आधुनिक काळातील महाराष्ट्र आणि केंद्रीय सरकारने सम्राट अशोक आणि सातवाहन राजे यांचा आदर्श घ्यावा हीच अपेक्षा.
Comments
Post a Comment